<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>न्यूज हाऊस  News house </title>
	<atom:link href="https://newshouse.co.in/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://newshouse.co.in/</link>
	<description>न्यूज हाऊस  News house</description>
	<lastBuildDate>Sun, 26 Jul 2026 08:59:35 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0.2</generator>

<image>
	<url>https://newshouse.co.in/wp-content/uploads/2025/04/cropped-NEWS-HOUSE-1-1-32x32.png</url>
	<title>न्यूज हाऊस  News house </title>
	<link>https://newshouse.co.in/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>&#8220;अपघाताला वर्ष उलटलं&#8230; पण प्रशासन अजून झोपेत!&#8221;</title>
		<link>https://newshouse.co.in/savarde-bus-stop-destroyed/</link>
					<comments>https://newshouse.co.in/savarde-bus-stop-destroyed/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[NEWS HOUSE]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 26 Jul 2026 08:59:35 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कोकण]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newshouse.co.in/?p=21764</guid>

					<description><![CDATA[<p>&#8220;अपघाताला वर्ष उलटलं&#8230; पण प्रशासन अजून झोपेत!&#8221; सावर्डे बस थांबा उद्ध्वस्तच; प्रवाशांचा संताप प्रशासनाविरोधात तीव्र रोष 🔺विनायक सावंत🔺 सावर्डे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (NH-66) सावर्डे येथील मुख्य बस थांबा (पिकअप शेड) गेल्या तब्बल एका वर्षापासून उद्ध्वस्त अवस्थेत पडून असून संबंधित यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा संयम आता संपत आला आहे. दररोज शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून या ... <a title="&#8220;अपघाताला वर्ष उलटलं&#8230; पण प्रशासन अजून झोपेत!&#8221;" class="read-more" href="https://newshouse.co.in/savarde-bus-stop-destroyed/" aria-label="Read more about &#8220;अपघाताला वर्ष उलटलं&#8230; पण प्रशासन अजून झोपेत!&#8221;">Read more</a></p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/savarde-bus-stop-destroyed/">&#8220;अपघाताला वर्ष उलटलं&#8230; पण प्रशासन अजून झोपेत!&#8221;</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<h2 style="text-align: center;"><span style="color: #ff0000;"><strong>&#8220;अपघाताला वर्ष उलटलं&#8230; पण प्रशासन अजून झोपेत!&#8221;</strong></span></h2>
<h3 style="text-align: center;"><span style="color: #333300;"><strong>सावर्डे बस थांबा उद्ध्वस्तच; प्रवाशांचा संताप</strong></span></h3>
<h3 style="text-align: center;"><span style="color: #333300;"><strong>प्रशासनाविरोधात तीव्र रोष</strong></span></h3>
<h5><span style="color: #800080;"><strong>🔺विनायक सावंत🔺</strong></span></h5>
<p><strong>सावर्डे :</strong> मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (NH-66) सावर्डे येथील मुख्य बस थांबा (पिकअप शेड) गेल्या तब्बल एका वर्षापासून उद्ध्वस्त अवस्थेत पडून असून संबंधित यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा संयम आता संपत आला आहे. दररोज शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून या धोकादायक बसथांब्यावर उभे राहत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.</p>
<p><img fetchpriority="high" decoding="async" class="aligncenter size-full wp-image-21765" src="https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260726_142815.jpg" alt="" width="960" height="1280" srcset="https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260726_142815.jpg 960w, https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260726_142815-225x300.jpg 225w, https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260726_142815-768x1024.jpg 768w, https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260726_142815-640x853.jpg 640w, https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260726_142815-150x200.jpg 150w" sizes="(max-width: 960px) 100vw, 960px" /></p>
<p>सुमारे वर्षभरापूर्वी मुंबईकडून येणाऱ्या भरधाव लक्झरी बसने नियंत्रण गमावून विभाजक ओलांडत विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर असलेल्या सावर्डे बस थांब्याला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात बस थांब्याचे पिकअप शेड पूर्णपणे वाकले, पत्रे फाटली आणि शेजारील स्ट्रीट लाईटचा विद्युत खांबही कोसळला. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने त्या वेळी थांब्यावर प्रवासी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेला वर्षभर उलटूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अथवा संबंधित विभागाने बस थांब्याची दुरुस्ती करण्याची तसदी घेतलेली नाही. परिणामी उद्ध्वस्त अवस्थेतील हा बस थांबा आजही प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करत आहे.</p>
<p>सध्या बस थांब्याचे लोखंडी खांब गंजून वाकले आहेत, मागील पत्रा पूर्णपणे फाटला आहे, बसण्यासाठीचे बाक मोडकळीस आले असून संपूर्ण परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. अपघातात पडलेल्या स्ट्रीट लाईटच्या खांबाचा केवळ चौथरा उरला असून लोखंडी सळ्या उघड्यावर असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी स्थानिकांनी प्लास्टिकचे कागद आणि फाटके कपडे बांधून तात्पुरते आच्छादन तयार केले आहे. ही परिस्थिती प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.</p>
<p>सावर्डे हा चिपळूण तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा बसथांबा असून येथून मुंबई, पुणे, रत्नागिरीसह विविध ठिकाणी जाणाऱ्या एसटी व खाजगी बसेस थांबतात. दररोज शेकडो प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मोडकळीस आलेल्या थांब्यावर ताटकळत उभे राहावे लागते. विशेषतः पावसाळ्यात प्रवाशांचे अक्षरशः हाल होत असून महिलांमध्ये रात्रीच्या वेळी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.</p>
<p>&#8220;अपघाताला वर्ष झाले, अनेकदा तक्रारी केल्या; मात्र प्रशासनाला जागच आलेली नाही. नवीन बसथांबा आणि स्ट्रीट लाईट उभारण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहायची?&#8221; असा संतप्त सवाल स्थानिक प्रवासी आणि ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.</p>
<p>प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने हस्तक्षेप करून सावर्डे येथे नवीन, सुरक्षित आणि सुसज्ज बसथांबा तसेच स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे.</p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/savarde-bus-stop-destroyed/">&#8220;अपघाताला वर्ष उलटलं&#8230; पण प्रशासन अजून झोपेत!&#8221;</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://newshouse.co.in/savarde-bus-stop-destroyed/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
		<post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">21764</post-id>	</item>
		<item>
		<title>विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर मागे!</title>
		<link>https://newshouse.co.in/cjp-and-the-student-protest-finally-called-off/</link>
					<comments>https://newshouse.co.in/cjp-and-the-student-protest-finally-called-off/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[NEWS HOUSE]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 25 Jul 2026 14:23:36 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कोकण]]></category>
		<category><![CDATA[ताज्या घडामोडी]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राज्य]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newshouse.co.in/?p=21761</guid>

					<description><![CDATA[<p>विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर मागे! 🔴सरकारसोबतच्या चर्चेनंतर निर्णय 🔴धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, 🔴एफआयआर मागे घेण्यासह प्रमुख मागण्या मान्य 🔴लेखी हमी देणार सरकार नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थी आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. सरकारसोबत झालेल्या तिसऱ्या फेरीतील चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सहमती झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ... <a title="विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर मागे!" class="read-more" href="https://newshouse.co.in/cjp-and-the-student-protest-finally-called-off/" aria-label="Read more about विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर मागे!">Read more</a></p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/cjp-and-the-student-protest-finally-called-off/">विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर मागे!</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<h1 style="text-align: center;"><span style="color: #ff0000;"><strong>विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर मागे!</strong></span></h1>
<h4><span style="color: #000000;"><strong>🔴सरकारसोबतच्या चर्चेनंतर निर्णय</strong></span></h4>
<h4><span style="color: #000000;"><strong>🔴धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,</strong></span></h4>
<h4><span style="color: #000000;"><strong>🔴एफआयआर मागे घेण्यासह प्रमुख मागण्या मान्य</strong></span></h4>
<h4><span style="color: #000000;"><strong>🔴लेखी हमी देणार सरकार</strong></span></h4>
<p><strong>नवी दिल्ली :</strong> दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थी आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. सरकारसोबत झालेल्या तिसऱ्या फेरीतील चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सहमती झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. यावेळी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते.</p>
<p>दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सौरव दास यांनी सांगितले की, आंदोलन सुरू करण्यापूर्वी तीन प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी पहिली मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती. सरकारने ही मागणी मान्य केल्याने धर्मेंद्र प्रधान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यामुळे आंदोलनकर्त्यांची पहिली मागणी पूर्ण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.</p>
<p>दुसऱ्या मागणीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे (एफआयआर) मागे घेण्यास सरकारने सहमती दर्शवली आहे. विशेषतः भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये आंदोलनकर्त्यांवरील सर्व एफआयआर मागे घेतले जातील. तसेच भविष्यात आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर किंवा कॉकरोच जनता पार्टीच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.</p>
<p>सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकारकडून मंगळवारपर्यंत या सर्व निर्णयांची लेखी हमी दिली जाणार आहे. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या व्यक्तींना १ कोटी रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याच्या मागणीलाही सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>यावेळी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे चार मुद्द्यांचा लेखी मसुदा सादर केला होता. त्यामध्ये विविध राज्यांमधील आंदोलनकर्त्यांवरील एफआयआर मागे घेणे, नियमानुसार जास्तीत जास्त नुकसानभरपाई देणे, शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसंदर्भात आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या मागण्यांच्या सनदेचा सविस्तर अभ्यास करणे आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळासोबत पुढील काळातही सातत्याने चर्चा सुरू ठेवणे या मुद्द्यांचा समावेश होता. या सर्व बाबींवर सकारात्मक सहमती झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.</p>
<p>सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या या सामंजस्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर शांततापूर्ण सांगता झाली असून शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि इतर मागण्यांबाबत सरकार व आंदोलनकर्त्यांमध्ये पुढील चर्चेचा मार्गही मोकळा झाला आहे.</p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/cjp-and-the-student-protest-finally-called-off/">विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर मागे!</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://newshouse.co.in/cjp-and-the-student-protest-finally-called-off/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
		<post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">21761</post-id>	</item>
		<item>
		<title>येलोंदेवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांची रविवारी निर्णायक बैठक</title>
		<link>https://newshouse.co.in/palakmantri-invited-meeting-about-yelondevadi-dam/</link>
					<comments>https://newshouse.co.in/palakmantri-invited-meeting-about-yelondevadi-dam/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[NEWS HOUSE]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 25 Jul 2026 08:49:07 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कोकण]]></category>
		<category><![CDATA[ताज्या घडामोडी]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newshouse.co.in/?p=21757</guid>

					<description><![CDATA[<p>येलोंदेवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांची रविवारी निर्णायक बैठक शिरवली व देवखेरकी येथील बांधकाम संपादनासह विविध विषयांवर चर्चा चिपळूण: चिपळूण तालुक्यातील येलोंदेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत धरणाच्या बुडीक्षेत्राबाहेरील शिरवली व देवखेरकी येथील बांधकामांच्या संपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २६ जुलै रोजी दुपारी १ वाजता पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत पाली येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या ... <a title="येलोंदेवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांची रविवारी निर्णायक बैठक" class="read-more" href="https://newshouse.co.in/palakmantri-invited-meeting-about-yelondevadi-dam/" aria-label="Read more about येलोंदेवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांची रविवारी निर्णायक बैठक">Read more</a></p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/palakmantri-invited-meeting-about-yelondevadi-dam/">येलोंदेवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांची रविवारी निर्णायक बैठक</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<h3 style="text-align: center;"><span style="color: #808000;"><strong>येलोंदेवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांची रविवारी निर्णायक बैठक</strong></span></h3>
<h4 style="text-align: center;"><strong><span style="color: #ff0000;">शिरवली व देवखेरकी येथील बांधकाम संपादनासह विविध विषयांवर चर्चा</span></strong></h4>
<p>चिपळूण: चिपळूण तालुक्यातील येलोंदेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत धरणाच्या बुडीक्षेत्राबाहेरील शिरवली व देवखेरकी येथील बांधकामांच्या संपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २६ जुलै रोजी दुपारी १ वाजता पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत पाली येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, विविध अडचणी आणि संपादन प्रक्रियेसंदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.<br />
येलोंदेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शिरवली व देवखेरकी गावांतील धरणाच्या बुडीक्षेत्राबाहेरील बांधकामांच्या संपादनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचे वातावरण असून, शासन स्तरावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी सातत्याने होत आहे.<br />
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत आणि संदीप सावंत यांनी पालकमंत्री उदयजी सामंत यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्त, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी संबंधित विभागाला बैठकीचे निर्देश दिले असून, त्यानुसार २६ जुलै रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.<br />
या बैठकीस जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, बांधकाम संपादन प्रक्रिया, नुकसानभरपाईसंदर्भातील मुद्दे आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.<br />
या बैठकीकडे येलोंदेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांसह शिरवली व देवखेरकी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांवर ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/palakmantri-invited-meeting-about-yelondevadi-dam/">येलोंदेवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांची रविवारी निर्णायक बैठक</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://newshouse.co.in/palakmantri-invited-meeting-about-yelondevadi-dam/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
		<post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">21757</post-id>	</item>
		<item>
		<title>गुणवत्ता मुल्यमापनात गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी ची राष्ट्रीय स्तरावर झेप</title>
		<link>https://newshouse.co.in/govindrav-nikam-college-of-pharmacy-quality-evalutaion/</link>
					<comments>https://newshouse.co.in/govindrav-nikam-college-of-pharmacy-quality-evalutaion/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[NEWS HOUSE]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 25 Jul 2026 08:29:49 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कोकण]]></category>
		<category><![CDATA[टेक्नोलॉजी]]></category>
		<category><![CDATA[ताज्या घडामोडी]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newshouse.co.in/?p=21754</guid>

					<description><![CDATA[<p>                              गुणवत्ता मुल्यमापनात गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी ची राष्ट्रीय स्तरावर झेप देशभरातील ३९८ फार्मसी महाविद्यालयातून ७३ वा क्रमांक चिपळूण ः तालुक्यातील सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. फार्मसी कौन्सिल ... <a title="गुणवत्ता मुल्यमापनात गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी ची राष्ट्रीय स्तरावर झेप" class="read-more" href="https://newshouse.co.in/govindrav-nikam-college-of-pharmacy-quality-evalutaion/" aria-label="Read more about गुणवत्ता मुल्यमापनात गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी ची राष्ट्रीय स्तरावर झेप">Read more</a></p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/govindrav-nikam-college-of-pharmacy-quality-evalutaion/">गुणवत्ता मुल्यमापनात गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी ची राष्ट्रीय स्तरावर झेप</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<h3 style="text-align: center;"><span style="color: #ff0000;"><b>                              गुणवत्ता मुल्यमापनात गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी ची राष्ट्रीय स्तरावर झेप</b></span></h3>
<h4 style="text-align: center;"><span style="color: #800000;"><strong>देशभरातील ३९८ फार्मसी महाविद्यालयातून ७३ वा क्रमांक</strong></span></h4>
<p>चिपळूण ः तालुक्यातील सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या गुणवत्ता मूल्यमापन प्रक्रियेत सहभागी झालेल्या देशातील ३९८ फार्मसी महाविद्यालयांमधून गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीने ७३ वा क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेची प्रभावी छाप पाडली आहे.<br />
ही गुणवत्ता तपासणी अध्यापनाची गुणवत्ता, प्राध्यापकांची पात्रता, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन व नवोपक्रम, ग्रंथालय, विद्यार्थी विकास, उद्योगाभिमुख शिक्षण, गुणवत्ता हमी प्रणाली, संस्थात्मक व्यवस्थापन, पायाभूत सुविधा तसेच शैक्षणिक परिणाम अशा विविध निकषांच्या आधारे करण्यात आली. या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील मानाचे स्थान मिळविले.<br />
या गुणवत्ता मूल्यमापनासाठी आवश्यक असलेले दस्तऐवजीकरण, विविध विभागांकडील माहितीचे संकलन, गुणवत्ता निकषांनुसार अहवाल तयार करणे, माहितीची पडताळणी तसेच संपूर्ण प्रक्रियेचा समन्वय अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आला. महाविद्यालयाच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात संशोधन, नवोपक्रम, उद्योगाभिमुख शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाच्या बळावर महाविद्यालय आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास महाविद्यालय व्यवस्थापनाने व्यक्त केला.<br />
महाविद्यालयाने स्थापनेपासून गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती, उद्योग-संस्था सहकार्य, संशोधन संस्कृती, कौशल्य विकास आणि समाजाभिमुख उपक्रम यांना सातत्याने प्राधान्य दिले आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेच हे राष्ट्रीय स्तरावरील यश असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. या यशाबद्दल आमदार शेखर निकम, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष प्रशांत निकम सेक्रेटरी महेश महाडिक यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर आपले वेगळेपण सिद्ध केले असून भविष्यातही अशीच उत्कृष्ट परंपरा कायम ठेवावी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/govindrav-nikam-college-of-pharmacy-quality-evalutaion/">गुणवत्ता मुल्यमापनात गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी ची राष्ट्रीय स्तरावर झेप</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://newshouse.co.in/govindrav-nikam-college-of-pharmacy-quality-evalutaion/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
		<post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">21754</post-id>	</item>
		<item>
		<title>राज्यात समृद्धी नांदो, बळीराजाला भरघोस पीक लाभो!</title>
		<link>https://newshouse.co.in/government-mahapuja-of-shri-vitthal-rukmini-at-shrikshetra-pandharpur/</link>
					<comments>https://newshouse.co.in/government-mahapuja-of-shri-vitthal-rukmini-at-shrikshetra-pandharpur/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[NEWS HOUSE]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 25 Jul 2026 03:18:39 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कोकण]]></category>
		<category><![CDATA[ताज्या घडामोडी]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राज्य]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newshouse.co.in/?p=21750</guid>

					<description><![CDATA[<p>राज्यात समृद्धी नांदो, बळीराजाला भरघोस पीक लाभो! 🔷मुख्यमंत्री फडणवीसांनी विठुरायाच्या चरणी घातले साकडे 🔷मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा 🔷&#8217;माने दाम्पत्य&#8217; ठरले मानाचे वारकरी पंढरपूर, दि. २५ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज ... <a title="राज्यात समृद्धी नांदो, बळीराजाला भरघोस पीक लाभो!" class="read-more" href="https://newshouse.co.in/government-mahapuja-of-shri-vitthal-rukmini-at-shrikshetra-pandharpur/" aria-label="Read more about राज्यात समृद्धी नांदो, बळीराजाला भरघोस पीक लाभो!">Read more</a></p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/government-mahapuja-of-shri-vitthal-rukmini-at-shrikshetra-pandharpur/">राज्यात समृद्धी नांदो, बळीराजाला भरघोस पीक लाभो!</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<h2 dir="ltr" style="text-align: center;"><span style="color: #008000;"><strong>राज्यात समृद्धी नांदो, बळीराजाला भरघोस पीक लाभो!</strong></span></h2>
<h4 dir="ltr"><span style="color: #993300;"><b>🔷मुख्यमंत्री फडणवीसांनी विठुरायाच्या चरणी घातले साकडे</b></span></h4>
<p><span style="color: #993300;"><b>🔷मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा</b></span></p>
<p><span style="color: #993300;"><b>🔷&#8217;माने दाम्पत्य&#8217; ठरले मानाचे वारकरी</b></span></p>
<p dir="ltr"><b>पंढरपूर, दि. २५ :</b> आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता विठुरायाची विधिवत महापूजा करण्यात आली. यावेळी राज्यातील शेतकरी सुखी राहावेत, सर्वदूर समाधानकारक पाऊस पडावा आणि महाराष्ट्र समृद्ध व्हावा, अशी मनोभावे प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी अर्पण केली.</p>
<p>महापूजेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, &#8220;बळीराजाच्या आयुष्यात आनंदाचे दिवस यावेत, राज्यात भरपूर पाऊस पडून शेती समृद्ध व्हावी आणि प्रत्येक कुटुंब सुख-समाधानाने नांदावे,&#8221; अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.</p>
<p>यंदाच्या शासकीय महापूजेचे विशेष आकर्षण ठरले ते धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील वारकरी दाम्पत्य बाळासाहेब माधव माने आणि प्रभावती बाळासाहेब माने यांचा गौरव. दरवर्षीप्रमाणे दर्शन रांगेतील एका निष्ठावान वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान दिला जातो. यावर्षी हा बहुमान माने दाम्पत्याला मिळाला.</p>
<p dir="ltr">सुमारे ७० वर्षीय बाळासाहेब माने हे व्यवसायाने शेतकरी असून गेली वीस वर्षे ते नियमितपणे आळंदी-पंढरपूर पायी वारी करतात. यंदा त्यांनी पत्नीसह वारीत सहभाग घेतला होता. मध्यरात्री दर्शन रांग बंद झाल्यानंतर सर्वप्रथम असलेल्या माने दाम्पत्याची निवड समितीने &#8216;मानाचे वारकरी&#8217; म्हणून निवड केली. विठ्ठलाच्या महापूजेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने त्यांनी भावूक होत समाधान व्यक्त केले.</p>
<p dir="ltr">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येलाच पंढरपुरात दाखल झाले होते. आज पहाटे दोनच्या सुमारास ते पत्नी अमृता फडणवीस व कुटुंबीयांसह मंदिरात पोहोचले. त्यानंतर अडीच वाजता श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर माता रुक्मिणीची शासकीय महापूजा विधिवत संपन्न झाली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान यंदा सलग सहाव्यांदा मिळविला.</p>
<p dir="ltr">महापूजेपूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची नित्यपूजा करण्यात आली. रुक्मिणी मातेची पूजा शिवाजी महाराज मोरे यांनी केली, तर पाद्यपूजेचा विधी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पार पडला.<br />
यंदाच्या आषाढी यात्रेसाठी देशभरातून ३० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाल्याचा अंदाज आहे. विठ्ठल नामाच्या अखंड गजराने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि वारकऱ्यांच्या भक्तिरसाने संपूर्ण पंढरी नगरी भारावून गेली आहे. चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून संत नामदेव पायरी, महाद्वार, पश्चिम द्वार तसेच प्रदक्षिणा मार्गावर दिवसभर वारकऱ्यांची प्रचंड रेलचेल पाहायला मिळाली.</p>
<p dir="ltr">विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी लागलेली रांग तब्बल २० किलोमीटरपर्यंत पोहोचली असून सुमारे ८० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी प्रतीक्षेत असल्याचे प्रशासनाने सांगितले. राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्ती, श्रद्धा आणि समतेचा संदेश देणारी आषाढी वारी यंदाही उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी होत आहे.</p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/government-mahapuja-of-shri-vitthal-rukmini-at-shrikshetra-pandharpur/">राज्यात समृद्धी नांदो, बळीराजाला भरघोस पीक लाभो!</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://newshouse.co.in/government-mahapuja-of-shri-vitthal-rukmini-at-shrikshetra-pandharpur/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
		<post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">21750</post-id>	</item>
		<item>
		<title>लोकनेते स्व. अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त सावर्डेत विविध सामाजिक उपक्रम</title>
		<link>https://newshouse.co.in/various-social-activities-in-sawarde/</link>
					<comments>https://newshouse.co.in/various-social-activities-in-sawarde/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[NEWS HOUSE]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 24 Jul 2026 15:08:58 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कोकण]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newshouse.co.in/?p=21746</guid>

					<description><![CDATA[<p>लोकनेते स्व. अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त सावर्डेत विविध सामाजिक उपक्रम आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना रोपवाटप सावर्डे (प्रतिनिधी) : लोकनेते तथा विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात ... <a title="लोकनेते स्व. अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त सावर्डेत विविध सामाजिक उपक्रम" class="read-more" href="https://newshouse.co.in/various-social-activities-in-sawarde/" aria-label="Read more about लोकनेते स्व. अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त सावर्डेत विविध सामाजिक उपक्रम">Read more</a></p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/various-social-activities-in-sawarde/">लोकनेते स्व. अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त सावर्डेत विविध सामाजिक उपक्रम</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<h3 style="text-align: center;"><span style="color: #800080;"><strong>लोकनेते स्व. अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त सावर्डेत विविध सामाजिक उपक्रम</strong></span></h3>
<h4 style="text-align: center;"><span style="color: #008000;"><strong>आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना रोपवाटप</strong></span></h4>
<p><strong>सावर्डे (प्रतिनिधी) :</strong> लोकनेते तथा विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात बुधवारी सकाळी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप तसेच स्वर्गीय अजितदादा यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.</p>
<p><img decoding="async" class="aligncenter size-full wp-image-21747" src="https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260724_203512.jpg" alt="" width="1600" height="1064" srcset="https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260724_203512.jpg 1600w, https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260724_203512-300x200.jpg 300w, https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260724_203512-1024x681.jpg 1024w, https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260724_203512-768x511.jpg 768w, https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260724_203512-1536x1021.jpg 1536w, https://newshouse.co.in/wp-content/uploads/2026/07/IMG_20260724_203512-150x100.jpg 150w" sizes="(max-width: 1600px) 100vw, 1600px" /></p>
<p>कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, महिला व युवक कार्यकर्ते तसेच विद्यार्थ्यांनी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्या ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.</p>
<p>जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लायन्स क्लब, सावर्डे यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे भेट देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने मिळालेल्या रोपाची लागवड करून त्याचे संगोपन करावे आणि पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन मान्यवरांनी केले. स्वर्गीय अजितदादा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हरित भविष्यासाठी वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजात रुजविण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.</p>
<p>त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकात वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला. या उपक्रमात उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध वृक्षांची लागवड केली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी वक्त्यांनी अधोरेखित केले.</p>
<p>संपूर्ण कार्यक्रम आमदार शेखर निकम यांच्या सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनासारखे विधायक उपक्रम सातत्याने राबविण्याची प्रेरणा आमदार निकम यांच्या माध्यमातून मिळत असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.</p>
<p>या कार्यक्रमास सावर्डे पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर, सावर्डे सरपंच (प्रशासक) समीक्षा बागवे, माजी सरपंच सुभाष मोहिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य युगंधरा राजेशिर्के, संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत निकम, बाबुशेठ चव्हाण, देवराज गरगटे, जमीर मुल्लाजी, सचिन कोल्हापुरे, अशोक काजरोळकर, प्रदीप निकम, प्राचार्य सुनीतकुमार पाटील, प्राचार्य उमेश लकेश्री, सई निकम-सुर्वे, सरिता कोल्हापुरे, विनायक सावंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, महिला व युवक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.</p>
<p>स्वर्गीय अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमधून त्यांच्या विकासाभिमुख विचारांना अभिवादन करण्यात आले. वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना रोपवाटपाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.</p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/various-social-activities-in-sawarde/">लोकनेते स्व. अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त सावर्डेत विविध सामाजिक उपक्रम</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://newshouse.co.in/various-social-activities-in-sawarde/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
		<post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">21746</post-id>	</item>
		<item>
		<title>वृक्षारोपणातून स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी</title>
		<link>https://newshouse.co.in/tree-plantation-at-kondhe/</link>
					<comments>https://newshouse.co.in/tree-plantation-at-kondhe/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[NEWS HOUSE]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 24 Jul 2026 14:45:40 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कोकण]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newshouse.co.in/?p=21743</guid>

					<description><![CDATA[<p>वृक्षारोपणातून स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी गणेश साबळे यांच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिक, युवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग चिपळूण, दि. २४ : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गणेश साबळे यांच्या पुढाकारातून कोंढे येथील रिगल कॉलेजजवळ वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ... <a title="वृक्षारोपणातून स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी" class="read-more" href="https://newshouse.co.in/tree-plantation-at-kondhe/" aria-label="Read more about वृक्षारोपणातून स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी">Read more</a></p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/tree-plantation-at-kondhe/">वृक्षारोपणातून स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<h3 style="text-align: center;"><span style="color: #008000;"><strong>वृक्षारोपणातून स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी</strong></span></h3>
<h4 style="text-align: center;"><span style="color: #800080;"><strong>गणेश साबळे यांच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश</strong></span></h4>
<h4 style="text-align: center;"><span style="color: #800080;"><strong>नागरिक, युवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग</strong></span></h4>
<p><strong>चिपळूण, दि. २४ :</strong> महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गणेश साबळे यांच्या पुढाकारातून कोंढे येथील रिगल कॉलेजजवळ वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिक, युवक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>
<p>स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत &#8220;झाडे लावा – झाडे जगवा&#8221; हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. &#8220;एक वृक्ष लावूया&#8230; पर्यावरण वाचवूया!&#8221; हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.</p>
<p>या कार्यक्रमास सरपंच माधवीताई कुळे, माजी पोलीस पाटील सुभाष नलावडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कुळे, संध्याताई करंजकर, मुंबई क्राईम ब्रांचचे पीएसआय अरविंद मोहिते, पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग माळी, खाडीपट्ट्यातील ज्येष्ठ नेते विलास वाजे, शिवसेना संघटक अशोकराव नलावडे, नाना नलावडे, सुधाकर नलावडे, विकास कदम, राजू तांबिटकर, उमेश करंजकर, ऋषीकेश नलावडे, राष्ट्रवादीचे उपतालुकाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, महेंद्र कुळे यांच्यासह अनेक नागरिक, युवक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.</p>
<p>कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नलावडे आणि विलास वाजे यांनी केले. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.</p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/tree-plantation-at-kondhe/">वृक्षारोपणातून स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://newshouse.co.in/tree-plantation-at-kondhe/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
		<post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">21743</post-id>	</item>
		<item>
		<title>चिपळूण येथे पर्यावरण जनजागृती उपक्रम</title>
		<link>https://newshouse.co.in/environmental-awareness-campaign/</link>
					<comments>https://newshouse.co.in/environmental-awareness-campaign/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[NEWS HOUSE]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 24 Jul 2026 14:15:57 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कोकण]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newshouse.co.in/?p=21740</guid>

					<description><![CDATA[<p>चिपळूण येथे पर्यावरण जनजागृती उपक्रम रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशनचा पुढाकार चिपळूण, दि. २४ : २८ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा, वडार कॉलनी (चिपळूण) येथे रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन, दापोली-रत्नागिरी पर्यावरण जिल्ह्याच्या वतीने &#8216;निसर्ग संवर्धन कसे करावे&#8217; या विषयावर मार्गदर्शनपर जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण, ... <a title="चिपळूण येथे पर्यावरण जनजागृती उपक्रम" class="read-more" href="https://newshouse.co.in/environmental-awareness-campaign/" aria-label="Read more about चिपळूण येथे पर्यावरण जनजागृती उपक्रम">Read more</a></p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/environmental-awareness-campaign/">चिपळूण येथे पर्यावरण जनजागृती उपक्रम</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<h2 style="text-align: center;"><span style="color: #008000;"><strong>चिपळूण येथे पर्यावरण जनजागृती उपक्रम</strong></span></h2>
<h3 style="text-align: center;"><span style="color: #800080;"><strong>रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशनचा पुढाकार</strong></span></h3>
<p><strong>चिपळूण, दि. २४ :</strong> २८ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा, वडार कॉलनी (चिपळूण) येथे रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन, दापोली-रत्नागिरी पर्यावरण जिल्ह्याच्या वतीने &#8216;निसर्ग संवर्धन कसे करावे&#8217; या विषयावर मार्गदर्शनपर जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला.</p>
<p>या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि निसर्गाशी सुसंवाद राखणे आवश्यक असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.<br />
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सेजल राजेंद्र जाधव, शिक्षिका सौ. अंजली अंकुश घाडगे तसेच सानिया शेख यांच्यासह शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>
<p>यावेळी सौ. वर्षा खटके-पाटील (रत्नागिरी पर्यावरण जिल्हाध्यक्ष) आणि सौ. अपूर्वा गायकवाड (चिपळूण पर्यावरण तालुकाध्यक्ष) यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी, निसर्गाचे महत्त्व आणि भावी पिढीसाठी पर्यावरण जतन करण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले.</p>
<p>कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. सेजल जाधव यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर आयोजकांच्या वतीने मुख्याध्यापिकांना वृक्ष भेट देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्यांचे आभार मानण्यात आले.</p>
<p>विद्यार्थ्यांनीही पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.</p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/environmental-awareness-campaign/">चिपळूण येथे पर्यावरण जनजागृती उपक्रम</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://newshouse.co.in/environmental-awareness-campaign/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
		<post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">21740</post-id>	</item>
		<item>
		<title>अनंत साळवी यांना राज्यस्तरीय &#8216;जीवनगौरव पुरस्कार&#8217; जाहीर</title>
		<link>https://newshouse.co.in/lifetime-achievement-award/</link>
					<comments>https://newshouse.co.in/lifetime-achievement-award/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[NEWS HOUSE]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 24 Jul 2026 14:03:31 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कोकण]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newshouse.co.in/?p=21737</guid>

					<description><![CDATA[<p>अनंत साळवी यांना राज्यस्तरीय &#8216;जीवनगौरव पुरस्कार&#8217; जाहीर समाजसेवेच्या अखंड प्रवासाला मानाचा मुजरा &#8216;आषाढ वारी&#8217; कार्यक्रमात उद्या होणार गौरव शिरगाव (मुनीर शेख) : समाजासाठी केलेल्या निस्वार्थ कार्याचा आणि अनेक दशकांच्या सेवाभावी योगदानाचा गौरव म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अनंत एकनाथ साळवी यांना चैतन्य आर्ट्स चिपळूण (रजि.) संस्थेतर्फे राज्यस्तरीय &#8216;जीवनगौरव पुरस्कार&#8217; जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिरगाव ... <a title="अनंत साळवी यांना राज्यस्तरीय &#8216;जीवनगौरव पुरस्कार&#8217; जाहीर" class="read-more" href="https://newshouse.co.in/lifetime-achievement-award/" aria-label="Read more about अनंत साळवी यांना राज्यस्तरीय &#8216;जीवनगौरव पुरस्कार&#8217; जाहीर">Read more</a></p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/lifetime-achievement-award/">अनंत साळवी यांना राज्यस्तरीय &#8216;जीवनगौरव पुरस्कार&#8217; जाहीर</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<h2 style="text-align: center;"><span style="color: #993300;"><strong>अनंत साळवी यांना राज्यस्तरीय &#8216;जीवनगौरव पुरस्कार&#8217; जाहीर</strong></span></h2>
<h3 style="text-align: center;"><span style="color: #008000;"><strong>समाजसेवेच्या अखंड प्रवासाला मानाचा मुजरा</strong></span></h3>
<h4 style="text-align: center;"><span style="color: #800080;"><strong>&#8216;आषाढ वारी&#8217; कार्यक्रमात उद्या होणार गौरव</strong></span></h4>
<p><strong>शिरगाव (मुनीर शेख) :</strong> समाजासाठी केलेल्या निस्वार्थ कार्याचा आणि अनेक दशकांच्या सेवाभावी योगदानाचा गौरव म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अनंत एकनाथ साळवी यांना चैतन्य आर्ट्स चिपळूण (रजि.) संस्थेतर्फे राज्यस्तरीय &#8216;जीवनगौरव पुरस्कार&#8217; जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिरगाव परिसरासह सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.</p>
<p>देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित &#8216;आषाढ वारी&#8217; या भक्तिमय कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनंत साळवी यांची झालेली निवड त्यांच्या दीर्घकाळाच्या निस्वार्थ समाजसेवेची राज्यस्तरीय दखल मानली जात आहे.</p>
<p>अनंत साळवी यांनी आयुष्यभर समाजालाच आपले कुटुंब मानत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. गरजूंना मदतीचा हात देणे, गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे, सामाजिक ऐक्य जपणे, युवकांना मार्गदर्शन करणे आणि कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजकार्यात स्वतःला वाहून घेणे, ही त्यांची ओळख बनली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना आधार मिळाला असून, त्यांनी समाजात विश्वास आणि माणुसकीचे नाते अधिक दृढ केले आहे.</p>
<p>आजच्या प्रसिद्धीच्या युगात निस्वार्थपणे समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होत असताना, अशा सेवाभावी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या कार्यातून अनेक युवकांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली असून, माणुसकीची मूल्ये जपण्याचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.</p>
<p>पुरस्काराची घोषणा होताच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अनंत साळवी यांचे अभिनंदन केले आहे. हा सन्मान योग्य व्यक्तीच्या वाट्याला आल्याची भावना व्यक्त करत त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.</p>
<p>अनंत एकनाथ साळवी यांना जाहीर झालेला &#8216;जीवनगौरव पुरस्कार&#8217; हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, निस्वार्थ समाजसेवा, समर्पण आणि माणुसकीच्या मूल्यांचा सन्मान असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.</p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/lifetime-achievement-award/">अनंत साळवी यांना राज्यस्तरीय &#8216;जीवनगौरव पुरस्कार&#8217; जाहीर</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://newshouse.co.in/lifetime-achievement-award/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
		<post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">21737</post-id>	</item>
		<item>
		<title>सभागृहातील भूमिका तथ्यांवर आधारित, वैयक्तिक नव्हती : मिथिलेश (विकी) नरळकर</title>
		<link>https://newshouse.co.in/mithilesh-naralkar-statment/</link>
					<comments>https://newshouse.co.in/mithilesh-naralkar-statment/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[NEWS HOUSE]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 24 Jul 2026 13:37:34 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कोकण]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newshouse.co.in/?p=21734</guid>

					<description><![CDATA[<p>सभागृहातील भूमिका तथ्यांवर आधारित, वैयक्तिक नव्हती : मिथिलेश (विकी) नरळकर चिपळूण, दि. २४ : चिपळूण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान भाजपचे गटनेते शशिकांत मोदी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे गटनेते मिथिलेश (विकी) नरळकर यांच्यात झालेल्या शाब्दिक वादानंतर आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. शशिकांत मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडल्यानंतर नरळकर यांनीही सविस्तर निवेदन ... <a title="सभागृहातील भूमिका तथ्यांवर आधारित, वैयक्तिक नव्हती : मिथिलेश (विकी) नरळकर" class="read-more" href="https://newshouse.co.in/mithilesh-naralkar-statment/" aria-label="Read more about सभागृहातील भूमिका तथ्यांवर आधारित, वैयक्तिक नव्हती : मिथिलेश (विकी) नरळकर">Read more</a></p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/mithilesh-naralkar-statment/">सभागृहातील भूमिका तथ्यांवर आधारित, वैयक्तिक नव्हती : मिथिलेश (विकी) नरळकर</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<h3 style="text-align: center;"><span style="color: #333300;"><strong>सभागृहातील भूमिका तथ्यांवर आधारित, वैयक्तिक नव्हती : मिथिलेश (विकी) नरळकर</strong></span></h3>
<p><strong>चिपळूण, दि. २४ :</strong> चिपळूण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान भाजपचे गटनेते शशिकांत मोदी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे गटनेते मिथिलेश (विकी) नरळकर यांच्यात झालेल्या शाब्दिक वादानंतर आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. शशिकांत मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडल्यानंतर नरळकर यांनीही सविस्तर निवेदन प्रसिद्ध करत सभागृहातील आपली भूमिका ही पूर्णपणे तथ्यांवर आधारित असून ती कोणत्याही व्यक्तीविरोधात नव्हती, असे स्पष्ट केले आहे.</p>
<p>नरळकर यांनी म्हटले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मात्र नागरिकांसमोर संपूर्ण वस्तुस्थिती येणे तितकेच आवश्यक आहे. माझा विरोध शशिकांत मोदी या व्यक्तीला नसून त्यांनी सभागृहात विषय मांडण्याच्या पद्धतीला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.<br />
त्यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील खड्डे आणि महानगर गॅसच्या पाईपलाईनमुळे पडलेल्या चरींचा विषय यापूर्वीच्या सभेत सविस्तर चर्चेला आला होता. त्यावेळी रत्नागिरी नगरपरिषदेतील हॉट मिक्स मटेरियलचा डेमो पाहून प्रशासनाने त्याबाबत माहिती दिली होती. एका बॅगची किंमत सुमारे ७०० ते ७५० रुपये असून त्यासाठी स्वतंत्र रोलर आणि मोठा खर्च आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती पाहता हा पर्याय तातडीने व्यवहार्य नसल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्यामुळे विषयपत्रिकेत नसलेला तोच विषय पुन्हा चर्चेला आणण्यामागचा उद्देश काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.</p>
<p>नरळकर यांनी निवेदनात असेही म्हटले की, शशिकांत मोदी प्रत्येकवेळी केवळ &#8220;सुवर्ण भास्कर&#8221; परिसरातील खड्ड्यांचाच उल्लेख करत होते. मात्र आयसीआयसीआय बँकेसमोर, बुरुमतळी, पोलीस ठाण्यासमोर तसेच शहरातील इतर अनेक ठिकाणीही गंभीर खड्डे आहेत. त्यामुळे केवळ निवडक ठिकाणांनाच प्राधान्य का दिले जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जनतेच्या सुरक्षेचा निकष संपूर्ण शहरासाठी समान असला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.</p>
<p>सभागृहात नगराध्यक्षांनी संबंधित ठिकाणी मोफत काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव मांडल्याचे सांगत नरळकर यांनी या कामाचा खर्च कोण उचलणार, निधी कोणत्या तरतुदीतून उपलब्ध होणार आणि त्यामध्ये पारदर्शकता कशी राखली जाणार, याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नसल्याचे म्हटले आहे. एका प्रभागासाठी असा निकष लावला जात असेल, तर तोच निकष शहरातील सर्व धोकादायक ठिकाणांसाठीही लागू झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.</p>
<p>याशिवाय संबंधित रस्त्यांच्या कायमस्वरूपी कामांचा डीपीआर यापूर्वीच मंजूर झाला असून काही दिवसांत नवीन रस्त्यांची कामे सुरू होणार असताना पुन्हा मोठा खर्च करणे आर्थिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. नगरपरिषदेचा प्रत्येक रुपया हा नागरिकांच्या करातून येत असल्याने खर्चात विवेक, समानता आणि पारदर्शकता आवश्यक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.</p>
<p>सभागृहातील माझे संपूर्ण बोलणे हे नगराध्यक्ष आणि सभागृहाला उद्देशून होते. त्यामध्ये कोणतीही वैयक्तिक टीका नव्हती. शशिकांत मोदी हे चार वेळा निवडून आलेले अनुभवी नगरसेवक असून त्यांनी सभागृहाची शिस्त आणि निर्णय प्रक्रियेचे गांभीर्य जपावे, अशी अपेक्षाही नरळकर यांनी व्यक्त केली.</p>
<p>पावसाळ्यापूर्वी त्यांच्या पक्षाने शहरातील खड्डे आणि चरींबाबत दोन वेळा अधिकृत निवेदने दिली होती. त्यावेळी प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर आज नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला नसता. केवळ चर्चा करून उपयोग नाही, तर निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.</p>
<p>सभागृहाबाहेर आम्ही मित्र असू शकतो; मात्र सभागृहात आम्ही केवळ चिपळूणच्या जनतेचे प्रतिनिधी आहोत. जनतेने आम्हाला त्यांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय, चुकीचे निर्णय किंवा शहरहिताला बाधा पोहोचेल अशा कोणत्याही बाबींवर आम्ही ठाम भूमिका घेत राहू, असे नरळकर यांनी स्पष्ट केले.</p>
<p>शेवटी त्यांनी सत्ताधारी आघाडीवरही टीका करत विरोधक म्हणून शहराच्या हिताच्या प्रत्येक चांगल्या कामाला आमचे सहकार्य कायम राहील, असे सांगितले. मात्र त्यासाठी सत्ताधारी आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रथम आपापसातील मतभेद आणि समन्वयाचा अभाव दूर करून एकसंधपणे काम करणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांमध्येच एकमत नसेल तर त्याचा फटका विकासकामांना आणि नागरिकांनाच बसतो. आमचा विरोध कोणत्याही व्यक्तीला नसून चुकीच्या निर्णयांना आहे. व्यक्ती आणि पक्ष बदलू शकतात, मात्र जनहिताची भूमिका बदलता कामा नये, असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले.</p>
<p>The post <a href="https://newshouse.co.in/mithilesh-naralkar-statment/">सभागृहातील भूमिका तथ्यांवर आधारित, वैयक्तिक नव्हती : मिथिलेश (विकी) नरळकर</a> appeared first on <a href="https://newshouse.co.in">न्यूज हाऊस  News house </a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://newshouse.co.in/mithilesh-naralkar-statment/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
		<post-id xmlns="com-wordpress:feed-additions:1">21734</post-id>	</item>
	</channel>
</rss>
